पोस्ट्स

कालवश लता वसंतराव जावळे यांच्या स्मरनार्थ विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य मूर्तीची प्रतिष्ठापना.

इमेज
कालवश लता वसंतराव जावळे यांच्या स्मरनार्थ विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य मूर्तीची प्रतिष्ठापना. माजलगांव : ( प्रतिनिधी ) शहरातील यशोधरा बुद्ध विहार फुले नगर माजलगांव येथे वसंतराव बाबुराव जावळे यांच्या पत्नी कालवश लता वसंतराव जावळे यांच्या स्मरनार्थ विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य अशा o७ फुट उंचीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना तालुक्यातील विविध क्षेत्रातील मान्यववरांच्या उपस्थीतीत व पूजनिय भदंत पंय्यातीस महाथेरो ( सिरसाळा ) यांच्या हस्ते दिनांक ११ डिसेंबर रोजी करण्यात आली आहे. या कार्यक्रमाचे आयोजन डॉ. पंकज वसंतराव जावळे , प्रज्ञानंद वसंतराव जावळे , प्रितमकुमार वसंतराव जावळे व प्रज्वल वसंतराव जावळे यांनी केले असून सात फूट उंचीच्या भव्य अशा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुर्तीची मिरवणूक यशोधरा बुद्ध विहार फुलेनगर येथून डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौकातुन यशोधरा बुद्ध विहारा पर्यंत काढण्यात आली. या मिरवणूकी मध्ये शहरातील बुद्ध व डॉ.आंबेडकर प्रेमी जनतेने मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला होता. या कार्यक्रमाचे उद्घाटन आमद...

ग्रामविकास पॅनल पाखर सांगवी च्या प्रचाराला जोरदार सुरुवात

इमेज
पाखसांगवी येथील ग्रामविकास पॅनलच्या प्रचाराला जोरदार सुरुवात संतोष सोनवने (लातूर) : -सध्या महाराष्ट्रामध्ये ग्रामपंचायत निवडणुका लागल्या आहेत लातूर शहर मतदार संघातील लातूर पासून काही अंतरावर असलेलं पाखरसांगवी हे गाव कायम चर्चेत असतं आणि आता निवडणुकीमुळे लातूर जिल्ह्यातील सर्वांचं या निवडणुकीकडे लक्ष लागलं आहे या निवडणुकीमध्ये विद्यमान उपसरपंच भीमाशंकर उर्फ राजाभाऊ लखादिवे यांचे ग्रामविकास पॅनल पुन्हा निवडणुकीला सामोरे जात आहे पाखरसांगवी येथील सहा वार्डामध्ये 17 उमेदवार निवडले जाणार आहेत व थेट जनतेतून सरपंच निवडला जाणार आहे यापैकी ग्राम विकास पॅनलचे पांडुरंग बोयने हे बिनविरोध विजयी झाले आहेत म्हणून आता सहा वार्डामधून 16 उमेदवार व सरपंच थेट जनतेतून निवडले जाणार आहेत आज ग्रामपंचायत निवडणुकीचा ग्राम विकास पॅनल चा शुभारंभ करण्यात आला याप्रसंगी नवीन वस्ती व गावातील हजारो महिला व नागरिकांनी ग्रामविकास पॅनलच्या प्रचार शुभारंभ प्रसंगी उपस्थिती लावली होती विधानसभा असो की लोकसभा असो आत्तापर्यंत पाखर सांगू मध्ये भूतो न भविष्यती अशी ग्रामविकास पॅनल ची रॅली निघाली होती या रॅलीतील काही...

शिवसेना स्वारिप युती प्रार्थमिक बैठक संपंन्न - विजय साळवे

इमेज
शिवसेना स्वारिप युती प्रार्थमिक बैठक संपंन्न - विजय साळवे माजलगाव :- आगामी काळात जुल्मी भाजपा सरकारला रोकण्यासाठी महाराष्ट्रात शिवसेना व स्वारिप नेत्यांची युती बाबात महत्वपूर्ण बैठक उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या नेत्या व विधान परिषदेच्या उपसभापती ना. निलमताई गोरे यांच्या सोबत आंबेडकरी प्रख्यात विचारवंत अर्जुनजी डांगळे सह स्वारीप नेते अशोक वाघमारे, बाळाराम जाधव , अमित हिरवे, विजय साळवे यांच्या उपस्थितीत संपन्न झाली. महाराष्ट्रातील धर्मांध शक्तींचा बिमोड करून जुलमी भाजपा सरकारला आगामी काळात रोखण्यासाठी शिवशक्ती व भीमशक्ती एकत्र आल्याशिवाय पर्याय नसल्याचे स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे मराठवाडा अध्यक्ष विजय साळवे यांनी सांगितले असून यासंदर्भात दिनांक ०७ डिसेंबर रोजी विधान परिषदेच्या उपसभापती नामदार नीलमताई गोरे यांच्यासोबत अत्यंत साधक बाधक चर्चा स्वारीपच्या महाराष्ट्रातील प्रमुख नेत्यांची विधानभवनाच्या सभागृहात संपन्न झाली आहे. लवकरच महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शिवसेनाप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्यासोबत भेट घेऊन आगामी काळातील घडामोडींवर सविस्तर चर्चा करून शिवशक्...

बहुजनांनी डॉ.आंबेडकर, भगवान बुद्ध यांचे पंचशील तत्वज्ञान आत्मसात करून समाज सुधारण्याचे काम करावे...... आमदार, बाबासाहेब पाटील

इमेज
बहुजनांनी डॉ.आंबेडकर, भगवान बुद्ध यांचे पंचशील तत्वज्ञान आत्मसात करून समाज सुधारण्याचे काम करावे......          आमदार, बाबासाहेब पाटील ---------------------------------------- अहमदपूर- अहमदपूर येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक युवक मंडळ, अरुण भाऊसाहेब वाघंबर आयोजित " 66 वा महापरिनिर्वाण दिनानिमित्त " भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ माजी राज्यमंत्री बाळासाहेब जाधव यांच्या अध्यक्षतेखाली 66 वा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात येऊन आणि पंचशील त्रिशरण घेण्यात आले. यावेळी या कार्यक्रमाचे उद्घघाटक अहमदपूर-चाकुर तालुक्याचे आमदार बाबासाहेब पाटील हे आपल्या भाषणात म्हणाले की डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताची राज्यघटना ही अथक परिश्रम घेऊन लिहून काढली. हे संविधान सर्व जगात सर्वश्रेष्ठ असून.या संविधानामुळे सर्वसामान्य जनतेला न्याय मिळाला.या संविधानामुळे या देशात, जगात शांतता पंचशील आणि गौतम बुद्ध धम्माचे तत्त्वज्ञानाचा प्रसार, झाला असून.  त्यामुळे बहुजनांनी डॉ. आंबेडकरांचे व भगवान गौतम बुद्धांचे पंचशील तत्त्वज्ञान आत...

यशवंत विद्यालयामध्ये डॉक्टर बाबा साहेबांना अभिवादन

इमेज
*यशवंत विद्यालयामध्ये डॉक्टर बाबा साहेबांना अभिवादन*     अहमदपूर दि.(0 6. 12. 22) भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने यशवंत विद्यालयामध्ये त्यांच्या प्रतिमेला प्राचार्य व्ही व्ही गंपले यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले.     यावेळी सहशिक्षक श्री राजकुमार पाटील म्हणाले की, वाचाल तर वाचाल म्हणून मुलांनी शालेय जीवनामध्ये पुस्तकांचे वाचन मन लावून केले. तरच आपले पुढचे जीवन सुखी आणि यशस्वी होते असे सांगितले.     यावेळी विद्यार्थ्यांच्या वतीने दहावी वर्गातील संकल्प वाघमारे यांनी बाबासाहेबांच्या जीवनावर प्रकाश टाकला. या सोहळ्याचा अध्यक्ष समारोप प्राचार्य व्ही व्ही गंपले यांच्या भाषणाने झाला.     कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहशिक्षक राम तत्तापुरे यांनी सूत्रसंचालन शरद करकनाळे यांनी आभार प्रवीण मोरे यांनी मानले.     यावेळी या सोहळ्याला पर्यवेक्षक उमाकांत नरडेले, अशोक पेद्यै वाढ, अरुण मोरे सह मान्यवरांची उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक शिक्षकेतर कर...

डॉ.आंबेडकर हे स्वाभीमानाचा एक जळता ज्वालामुखी होते - आचार्य अत्रे

गुरुवार दिनांक 6 डिसेंबर 1956. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं दिल्लीत निधन झालं. सारा देश दु:खात बुडाला. मुंबईत बाबासाहेबांची प्रचंड महायात्रा निघाली. अंत्यविधीच्या वेळी श्रद्धांजलीपर भाषण फक्त एका व्यक्तीचं झालं. ते होते आचार्य अत्रे. अत्र्यांचं ते भाषण इतिहासात अजरामर झालं आहे. त्यानंतर अत्र्यांनी 'मराठा'तून सतत 12 दिवस बाबांच्या जीवनावर आणि तत्त्वज्ञानावर अग्रलेख लिहिले. त्यातील हा 7 डिसेंबरचा पहिला अग्रलेख ...... डॉ.आंबेडकर हे स्वाभीमानाचा एक जळता ज्वालामुखी होते - आचार्य अत्रे बाबा गेले सात कोटी अस्पृश्य आज पोरके झाले. भारतांतल्या अनाथांचा आणि अपंगांचा आज आधार गेला. शतकानुशतके समाजाने लाथाडलेल्या पतितांचा पालनहार गेला. दीनदुबळया दलितांचा कनवाळू कैवारी गेला. जुलमी आणि ढोंगी विषमतेविरुध्द जन्मभर प्राणपणाने झगडणारा झुंझार लढवय्या गेला. सामाजिक न्यायासाठी आणि माणुसकीच्या हक्कासाठी ज्यांनी जन्मभर आकाशपाताळ एक केले, असा बहादूर बंडखोर आज आमच्यामधून निघून गेला. पाच हजार वर्षे हिंदु समाजाने सात कोटी अस्पृश्यांचा जो अमानुष छळ केला, त्याला त्या समाजाकडून मिळालेले आंबेडकर हे एक बिनतोड आणि ...

प्रत्येक क्षेत्रात शिक्षणाचे अनन्य साधारण महत्त्व..!माजी आमदार बब्रूवान खंदाडे यांचे प्रतिपादन

इमेज
प्रत्येक क्षेत्रात शिक्षणाचे अनन्य साधारण महत्त्व..! माजी आमदार बब्रूवान खंदाडे यांचे प्रतिपादन अहमदपूर दि. राजकारण, समाजकारण आणी व्यापार अशा अनेक क्षेत्रात शिक्षणाला अनन्यसाधारण महत्त्व असून शिक्षणामुळे माणूस प्रगल्भ बनतो व समस्यांच्या उपायोजना शोधण्याचा प्रयत्न करतो त्यामुळे प्रत्येकानेच शिक्षणाची कास धरावी असे आग्रही प्रतिपादन माजी आमदार बब्रुवान खंदाडे यांनी केले. येथील सम्राट मित्र मंडळाच्या वतीने विविध क्षेत्रात यश प्राप्त करणाऱ्या मान्यवरांचा छोटेखानी सत्कार आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमात ते अध्यक्ष स्थानावरून बोलत होते. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या विद्यापरिषद सदस्य म्हणून निवडून आल्याबद्दल प्रा.डॉ. नारायण कांबळे, सेंट्रल युनिव्हर्सिटी अमेरिकेची डिलीट पदवी मिळाल्याबद्दल प्रा.डाॅ. सतीश ससाने तसेच अभिजीत वाघमारे यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी बोलताना खंदाडे म्हणाले की, शिक्षणामुळे सर्वांगीण विकास होतो समाजातील सर्व घटकांनी सातत्याने शिकण्याचा प्रयत्न करावा. या सत्काराला उत्तर देताना प्रा.डॉ.नारायण कांबळे म्...