उदयोगातुन अस्तित्व निर्माण करा - प्रा. सतिश डी कांबळे
उदयोगातुन निर्माण करा आस्तित्व - प्रा. सतिश डी कांबळे
लातुर- उद्योजकांची ग्रेट भेट या कार्यक्रमाचे आयोजन जुना आैसा रोड येथे सुगरणीचे लोंणच चविष्ट व चटकदार बनवणाऱ्या सौ. प्रितमताई जाधव लातुरकर यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून श्री. निलेश काळे साहेब (उदयोनिती तज्ञ) हे उपस्थित होते. तर श्री आंबेकर साहेब (जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा लातुर) श्री. सुर्यवंशी साहेब (जिल्हा उदयोग केंद्र उस्मानाबाद) व भारतीय स्टेट बँक ग्रामीण स्वरोजगार प्रशिक्षण संस्था लातुर येथील श्री. सतिश डी कांबळे (जिल्हा समन्वय) प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. यावेळी बोलताना श्री सतिश डी कांबळे म्हणाले भारतीय स्टेट बँक ग्रामीण स्वरोजगार प्रशिक्षण संस्था लातुर हि ग्रामीण भागातील सुसक्षित बेरोजगार युवकांना युवतींना व स्वंयसायता समुहातील महिलांना प्रशिक्षण देते तरी सुसक्षित बेरोजगारांनी आपल्या मधिल सुप्त गुणांचा शोध व पुढाकार घेऊन उद्योगाचे प्रशिक्षण घेऊन छोटा मोठा उदयोग उभारणी करुन स्वतः चे आस्तित्व निर्माण करा आज वाढती लोकसंख्या हि बेरोजगारीचे कारण होऊन बसली आहे. या बेरोजगारी वर मात करुन सौ. प्रितमताई जाधव यांनी आस्तित्व शोध स्वतः चा हे आपल्या कार्यातून दाखवून दिले आज यांच्या लोणच्याला लातुर मध्येच मागणी नाही तर अमेरिका मध्ये या सुगरणीचे लोणचे गेले आहे. आणि जिद्द चिकाटी, व आत्मविश्वासाच्या बळावर उदयोग उभारणी करून आपले आस्तित्व निर्माण केले आहे. तरी उपस्थित महिलांनी यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवावा व आर्थिक क्रांती निर्माण करावी असे आवाहन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ. प्रितमताई जाधव यांनी केले तर सुत्रसंचालन श्री. बालाजी सर यांनी केले व आभार सौ. तृप्ती राजापुरे यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सौ मेघा चेवले व सुगरणीचे लोणचे चे सर्व चाहते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
टिप्पण्या