पोस्ट्स

कोपरा वि.का.से. सोसायटीवर परिवर्तन शेतकरी विकास पॅनलचे निर्विवाद वर्चस्व

इमेज
कोपरा वि.का.से. सोसायटीवर परिवर्तन शेतकरी विकास पॅनलचे निर्विवाद वर्चस्व. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती दिनी ग्रा प ने नव निर्वाचीत संचालकांचा सत्कार किनगाव ( प्रतिनिधी ) अहमदपूर तालुक्यातील किनगाव परिसरातील कोपरा येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या निवडणुकीमध्ये माजी उपसरपंच भरतराव पलमटे आणि माजी कृषी अधिकारी अशोकराव कंदे यांच्या मार्गदर्शनाखाली परिवर्तन शेतकरी विकास पॅनेलचे निर्विवाद यश संपादन केले असून विद्यमान चेअरमन मदनराव पलमटे यांच्या शेतकरी विकास पॅनलचा चारी मुंड्या चीत पराभव करण्यात आला. परिवर्तन शेतकरी विकास पॅनलचे १३ च्या १३ संचालक बहुमताने विजयी झाले आहेत. परिवर्तन शेतकरी विकास पॅनेलचे सर्व श्री साहेबराव गोरे, सचिन पाटिल, एकनाथ पलमटे, उत्तम बने, इंद्रजीत देपे, माधव बेद्रपे, सुभाष पलमटे, उत्तमराव सुर्यवंशी ,संतोष कंदे , बालाजी देपे , सौ सुनंदा बनसोडे , सौ मिरा पलमटे, सौ अरुणा देपे उमेदवार विजयी झाले आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून आर.बी.कातळे यांनी काम पाहिले. यावेळी गट सचिव दिगंबर कांबळे उपस्थित होते हा विजय कोपरा येथील परिवर्तनवादी शेतकरी कष्टकऱ्...

नांदेड लातूर रोड व्हाया लोहा अहमदपूर चाकूर नवीन रेल्वे मार्ग मंजूर करा -रेल्वे संघर्ष कृती समितीची अर्थराज्यमंत्री ना.डाॅ.भागवत कराड यांच्याकडे मागणी

इमेज
*नांदेड लातूर रोड व्हाया लोहा अहमदपूर चाकूर नवीन रेल्वे मार्ग मंजूर करा* रेल्वे संघर्ष कृती समितीची अर्थराज्यमंत्री ना.डाॅ.भागवत कराड यांच्याकडे मागणी अहमदपूर/दि.20 गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबीत असणारा नांदेड-लातूर रोड व्हाया लोहा अहमदपुर चाकुर हा नवीन रेल्वे मार्ग तातडीने मंजूर करावा,मंजुरीच्या कामाला गती द्यावी अशी आग्रही मागणी रेल्वे संघर्ष कृती समितीच्या वतीने तालूक्याचे भूमिपूत्र केंद्रीय अर्थराज्यमंत्री ना.डाॅ.भागवत कराड यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. केंद्रीय अर्थराज्यमंत्री ना.डाॅ.भागवत कराड हे आज लातूर दौऱ्यावर होते.त्यामुळे रेल्वे संघर्ष कृती समितीच्या वतीने आज एक शिष्टमंडळ मौजे किनगांव येथे आले होते.या वेळी ना.डाॅ.भागवत कराड यांची भेट घेवून या नवीन मार्गाच्या मंजूरीच्या संबंधाने मागणीचे निवेदन दिले आहे. हा नवीन मार्ग दक्षिण व उत्तर भारताला जोडणारा कमी खर्चीक मार्ग असून नांदेड लोहा अहमदपूर चाकूर या भागासाठी हा खूप महत्त्व पूर्ण आहे.या मार्गाचा सर्व्हे झाला आहे मात्र केवळ उत्पन्न कमी येणार आहे या साठी हा मार्ग रेल्वेमंत्रालयात प्रलंबीत आहे.नांदेड व लातू...

महाराष्ट्रातील बालविवाह पद्धत कायमस्वरूपी बंद झाली पाहिजे. लेखक समीक्षक हेरंब कुलकर्णी यांचे प्रतिपादन.

इमेज
महाराष्ट्रातील बालविवाह पद्धत कायमस्वरूपी बंद झाली पाहिजे.     लेखक समीक्षक हेरंब कुलकर्णी यांचे प्रतिपादन.      अहमदपूर दि .17 .05. 22 भारत देशाने सबंध विश्वामध्ये नेत्रदीपक भरारी घेतलेली आहे परंतु देशाच्या ग्रामीण आणि शहरी विभागातील बालविवाह रोखण्यात आपल्याला फारसे यश आलेले नाहीत. त्यामुळे शासनस्तरावर बाल विवाह रोखण्यासाठी विशेष समिती नेमून हे बालविवाह थांबवावेत आणि मुलींना खास करून शिक्षणाच्या प्रवाहात आणून त्यांना दर्जेदार शिक्षण द्यावे असे जाहीर आवाहन प्रसिद्ध लेखक, समीक्षक, बाल विवाह प्रतिबंधक लढ्याचे प्रमुख श्रीयुत हेरंब कुलकर्णी यांनी केले.      ते दि. 16 रोजी न्यू शॉपिंग सेंटर येथे बाल विवाह का होतात हे विवाह ग्रामीण आणि शहरी भागात कुठे होतात याचा शोध आणि बोध करण्याप्रसंगी बैठकीत प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. बैठकीच्या अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ते सत्यनारायण काळे, प्रमुख अतिथी लेखक मोहिब कादरी, सहशिक्षक रामलिंग तत्तापुरे ,रमाकांत नागठाणे, गजानन भुसारे, रामनिवास भुतडा, गजानन आंधळे ,हरी कोटलवार सह मान्यवर उपस्थित होते....

भगवान गौतम बुद्ध यांचे तत्वज्ञान जगात श्रेष्ठ .....माजीमंत्री- विनायकराव पाटील.

इमेज
भगवान गौतम बुद्ध यांचे तत्वज्ञान जगात श्रेष्ठ .... .माजीमंत्री- विनायकराव पाटील.  ====================       अहमदपूर- अहमदपूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक युवक मंडळ, अरुण भाऊसाहेब वाघंबर आयोजित तथागत भगवान गौतम बुद्ध यांचा २५६६ वा सार्वजनिक जयंती सोहळा अहमदपूर शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ कर्मवीर भाऊसाहेब वाघंबर चौकात मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला त्यात कार्यक्रमाचे अध्यक्ष महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री विनायकराव पाटील हे होते ते आपल्या अध्यक्ष पदावरून भाषण करत असताना ते म्हणाले की डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, सावित्रीबाई फुले, रमाबाई आंबेडकर, या सर्व महाविभुतीने केलेल्या कार्यामुळे त्यांच्या मार्गदर्शनामुळे आज भारत देशात क्रांती झाली आहे या लोकांनी समाजा समाजामध्ये एकी घडवण्याचे काम केले आहे समाज सुधारण्याचे काम केले आहे त्यांच्या कार्यामुळेच आज आपण विविध पदावर महिलांना विविध पदावर विविध प्रकारचे शिक्षण घेण्याची संधी यांच्यामुळेच आपल्याला मिळाली आहे ...

अहमदपूर ते औरंगाबाद बस गाडी चा शुभारंभ.

इमेज
अहमदपूर ते औरंगाबाद बस गाडी चा शुभारंभ अहमदपूर दि.13 अहमदपूर येथून औरंगाबाद साठी जाणाऱ्या प्रवाशांची सोय व्हावी या साठी नव्याने सूरूवात केलेल्या गाडीचा शुभारंभ युवकनेते डाॅ.सिध्दार्थकुमार सूर्यवंशी यांच्या हस्ते नुकताच करण्यात आला. औरंगाबादला जाणाऱ्या प्रवाशांना दुपारच्या नंतर गाडी नसल्याने मोठी अडचण होत होती. त्यासाठी ही गाडी सूरू करण्याची मागणी अनेक दिवसांपासून प्रलंबीत होती.येथील आगाराचे कर्तव्यदक्ष आगार प्रमूख सोनवणे साहेब यांनी पूढाकार घेवून नव्याने ही गाडी मंजूर करून घेतली.  नूकतीच ही गाडी सूरू झाली असून या गाडीची रितसर पुजा करून या गाडीचा शुभारंभ युवक नेते डाॅ.सिध्दार्थकुमार सूर्यवंशी यांच्या हस्ते करण्यात आला.या गाडीमूळे अंबाजोगाई,केज,बीड, जालना,औरंगाबाद येथे.जाणाऱ्या प्रवाशांची सोय होणार असून प्रवाशांनी या गाडीचा लाभ घ्यावा असे अवाहन या प्रसंगी उद्घाटनपर मनोगत व्यक्त करताना डाॅ.सिध्दार्थकुमार सूर्यवंशी म्हणाले. या प्रसंगी आगार प्रमूख सोनवणे साहेब,वहातूक निरिक्षक देशमुख साहेब, पत्रकार सय्यद सलीमभाई आदींसह चालक-वाहक उपस्थित होते.

बौद्धधर्मीय वधूवर परीचय मेळावा...!!

इमेज
बौद्धधर्मीय वधूवर परीचय मेळावा...!! ----------------------------------------- अहमदपूर : येथील भारतीय बौद्धमहासभा तालुका शाखेच्या वतीने बौद्धधर्मीय वधूवर परीचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा परीचय मेळावा सिध्दार्थ काॅलनीतील संस्कार बुध्द विहार येथे दिनांक 21मे 2022 रोजी आयोजित करण्यात आला असून या मेळाव्यास मार्गदर्शन करण्यासाठी भारतीय बौद्ध महासभेचे लातूर जिल्हाध्यक्ष प्रा. बापूसाहेब गायकवाड जिल्हा उपाध्यक्ष विलास अल्टे बौध्दाचार्य देवदत्त बनसोङे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.  तरी पालकांनी नियोजित वधू वरांचे परीचय पत्र फोटोसह  9922582125 / 9511111690 या क्रमांकावर पाठवावेत व आपण स्वतःही उपस्थित रहावे असे आवाहन आयोजक एम.एन.क्षीरसागर, चंद्रशेखर भालेराव ,शेषेराव ससाणे, बालाजी दुगाने,संभाजी कांबळे ,श्रीमंत कांबळे यांनी केले आहे.

आरंभ प्रतिष्ठान ऑल इंडिया चे संस्थापक अध्यक्ष संतोष टाक यांची सुवर्णकार यांच्या निवासस्थानी भेट.

इमेज
*आरंभ प्रतिष्ठान ऑल इंडिया* चे संस्थापक अध्यक्ष संतोष टाक यांची सुवर्णकार यांच्या निवासस्थानी भेट . उदगीर प्रतिनिधी,  ध्यास सोनार समाजसेवेचा श्वास आपुलकीचा या ध्येयाने प्रेरित होऊन महाराष्ट्रातील सोनार समाजातील बेरोजगार युवकांना रोजगार या बाबत मार्गदर्शन करणारे , आरंभ प्रतिष्ठान ऑल इंडिया चे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष तथा पत्रकार संतोष टाक यांनी बालाजी सुवर्णकार यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली . या भेटीदरम्यान त्यांनी आरंभ प्रतिष्ठानच्यावतीने आयोजित करत असलेल्या शैक्षणिक सामाजिक इत्यादी कार्याची माहिती दिली व दिनांक १४ मे २०२२ रोजी नाशिक येथे होत असलेल्या सोनार समाजातील शैक्षणिक , सामाजिक , धार्मिक , इत्यादी कार्यात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या समाज बांधव व भगिनींचा राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्याचे निमंत्रण संतोष टाक यांनी बालाजी सुवर्णकार यांना निमंत्रण दिले . याप्रसंगी संतोष टाक व त्यांच्या सोबत आलेले पांचाळ यांचा संत नरहरी महाराज दैवज्ञ सोनार संघ उदगीर , संत नरहरी महाराज सेवाभावी शिक्षण संस्था उदगीर , सावित्रीबाई फुले महिला शिवणकला शिक्षण व प्रशिक्षण केंद्र उदगीर...