पोस्ट्स

ऑक्टोबर, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

अपंगांच्या 5% निधीसाठी प्रहार जनशक्ती पक्ष किनगाव आक्रमक परिसरातील ग्रामपंचायतींना दिले निधी वाटपाचे निवेदन

इमेज
*किनगाव प्रहार जनशक्ती पक्षाचा वतीने अपंगांचा ५ टक्के निधी साठी किनगाव सर्कल मधील गावातील ग्रामपंचायतीस भेटी.*     *किनगाव*:- प्रहार जनशक्ती पक्ष किनगाव च्या वतीने किनगाव सर्कल मधील गावो गावी जाऊन अपंग 5% निधी वाटपासाठी प्रहार च्या वतीने उपक्रम हाती घेण्यात आला आहे. आज ग्रामपंचायत कार्यालय मोहगाव / गुंजोटी चे ग्रामसेवक यांना जिल्हा प्रमुख राजाभाऊ चौगुले, तालुका अध्यक्ष संभाजी दादा केंद्रे, तालुका युवा अध्यक्ष बाळासाहेब गायकवाडयांच्या मार्गदर्शनाखाली आज दि 31/10/2020 ग्रामपंचायत कार्यालय मोहगाव,गुंजोटी,येथे जाऊन पुनर्वसन कायद्यानुसार अपंग बांधवाचा या आर्थिक वर्षातील 5% निधी वाटप करावा कारण कोरोना माहामारीच्या काळात अपंग बांधवांची आर्थिक परिस्थिती खुप बिकट झाली आहे व त्यांना आधार देण्यासाठी राखीव असलेला 5%निधी वाटपासाठी प्रहार जनशक्ती पक्ष किनगाव च्या वतीने सरपंच/ ग्रामविकास अधिकारी यांना निवेदन देताना शहराध्यक्ष बाळू आमले, योगेश आमले (माळी) अध्यक्ष, उपाध्यक्ष मोहसीन शेख, कार्यअध्यक्ष प्रकाश जोशी, कोषाध्यक्ष एजाज पठाण, सचिव दशरथ हैगले,दिनेश किनकर, वैजनाथ चाक...

वल्लभभाई पटेलांचा एस सी / एसटीच्या आरक्षणाला विरोध होता - प्रा. हरी नरके

*अनुसुचित जाती,जमातींच्या आरक्षणाचे विरोधक वल्लभभाई पटेल-* *प्रा. हरी नरके* ************************************ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या आग्रहामुळे आणि महात्मा गांधींच्या पाठींब्यामुळे अनुसुचित जाती व जमातींना राज्यघटनेने आरक्षण दिलेले होते. गांधींजींची हिंदुत्ववादी नथुराम गोडसेने ३० जानेवारी १९४८ ला हत्त्या करताच काँग्रेसमधल्या सनातनी गटाने आरक्षणविरोधी उसळी घेतली. त्यांचे नेते होते वल्लभभाई पटेल. पटेल यांचा हिंदुत्ववाद्यांना पुळका असतो, त्याची जी अनेक कारणे आहेत त्यातले मुख्य कारण पटेल आरक्षणविरोधी होते हे होय. गांधीहत्त्येच्या अवघ्या २५ व्या दिवशी पटेलांनी आरक्षणविरोधकांची बैठक बोलावली आणि आरक्षण काढून घेण्याचे डावपेच आखायला सुरुवात केली. पटेल घटना परिषदेच्या अल्पसंख्यांक उपसमितीचे अध्यक्ष होते. राज्य घटनेने अनु. जातीजमातींना दिलेले आरक्षण रद्द करावे असा ठराव स्वत: पटेलांनी ३० डिसेंबर १९४८ च्या उपसमितीच्या बैठकीत मांडला. त्याला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी कडाडून विरोध केला. ते म्हणाले, " घटना परिषदेने या आधीच आरक्षणाला मान्यता दिलेली असल्याने ते काढून घेण्याचा विषय उपसमितीच्य...

ओबीसींना सैनिकी शाळेत 27% आरक्षण , राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या लढ्याला यश

*सैनिकी शाळांमध्ये ओबीसींना मिळणार 27% आरक्षण* सैनिकी शाळांमध्ये ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना 27% आरक्षणाचा लाभ मिळेल ... हे शैक्षणिक सञ 2021-2022 पासुन लागु केले जात आहे राष्ट्रीय ओबीसी महासंघाने 2 डिसेंबर 2019 ला निवेदनाद्वारे सैनिक विद्यालयात ओबीसी आरक्षणाची मागणी केली होती व आंदोलनेही केली होती व ओबीसी पार्लमेन्ट कमेटीचे अध्यक्ष खा.गणेश सिंग याच्या कडे सातत्याने पाठपुरावा करत होते.भारतातील सैनिकी शाळांमध्ये प्रवेश घेउ इच्छिनाऱ्या बऱ्याच विद्यार्थ्यांसाठी आणि पालकांसाठी आनंदाची बातमी आहे भारत सरकारचे संरक्षण सचिव अजय कुमार यांनी या संदर्भात माहिती दिली आहे राष्ट्रीय ओबीसी महासंघाने या निर्णयाचे स्वागत केले आहे व ओबीसी पार्लमेन्ट कमेटी अध्यक्ष गणेश सिंग याचे राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ बबनराव तायवाडे, कार्याध्यक्ष डॉ खुशाल बोपचे, समन्वयक डॉ अशोक जीवतोडे , महासचिव सचिन राजूरकर, कर्मचारी अधिकारी महासंघ राज्याध्यक्ष शाम लेडे राज्य सरचिटणीस अनिल नाचपल्ले .दिनेश चोखारे, रणजित डवरे प्रा शेषराव येलेकर, बबलू कटरे, विजय पिदूरकर,सुषमा भड, कल्पना मानकर यांनी आभार मा...

वल्लभभाई पटेल शेतकऱ्यांचे सरदार - गणेश दादा हाके पाटील

इमेज
*वल्लभभाई शेतकऱ्यांचे सरदार होते*                   गणेश हाके  अहमदपूर : भारताचे लोहपुरुष वल्लभभाई पटेल यांना ब्रिटीशांच्या अन्यायाविरुद्ध शेतकऱ्यांचे नेतृत्व केले वल्लभभाई शेतकऱ्यांचे सरदार होते असे उद्गार भाजपाचे ज्येष्ठ नेते गणेश दादा हाके पाटील यांनी येथे काढले सरदार वल्लभभाई पटेल यांचे 145 व्या जयंतीनिमित्त बालाघाट तंत्रनिकेतन येथे आयोजित जयंती संमारंभात ते बोलत होते  स्वातंत्र्यलढ्यात वल्लभभाई ची भूमिका अत्यंत महत्त्वाची होती परंतु स्वातंत्र्यानंतर देशाततील सर्व संस्थाने खालसा केली हैदराबाद संस्थान खालसा करण्यासाठी लष्करी कारवाई करून हैदराबाद संस्थान ताब्यात घेतले व अखंड भारताचे स्वप्न साकार केले त्यांच्या या योगदानाबद्दल प्रत्येक भारतीयाने कृतज्ञ असले पाहिजे असे मत यावेळी श्री हाके यांनी व्यक्त केले. यावेळी श्री हाके यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांनी आदरांजली वाहिली. यावेळी प्राचार्य डॉ एन.पी. शिवपूजे,उपप्राचार्य एस.बी. नागरगोजे, आरदवाड एम.एन., दहिटनकर एस.बी.,कोपनर एस.टी.,...

ऑल इंडिया पँथर सेनेची आढावा बैठक संपन्न

इमेज
ऑल इंडिया पँथर सेना चाकुर च्या वतीने पदाधिकारी व कार्यकर्त्यांची आढावा बैठक संपन्न.             चाकुर :- चाकूर येथील शासकीय विश्रागृहात ऑल इंडिया पँथर सेनेच्या वतीने आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कशा प्रकारे संघटन बांधनी करावी या विषयावर लातूर जिल्हा निरिक्षक आकाश कांबळे व चापोली शहराध्यक्ष गोपाळ सरकाळे यांनी मार्गदर्शन केले.              यावेळी चाकुर ता. सचिव बुध्दभुषण गायकवाड, चाकुर शहराध्यक्ष विश्वजीत महालिंगे, कुलदीप कांबळे, गौतम तांदळे, गायक लखन माने, प्रतिक महालिंगे, अनुज कांबळे, समाधान गायकवाड आदिंची उपस्थिती होती.

प्रहार जनशक्ती पक्षाच्या व लॉयन्स क्लब उदगीरच्या वतीने मोतीबिंदु शिबीर संपन्न

इमेज
प्रहार जनशक्ती पक्ष व उदयगिरी लाँयन्स नेत्र रूग्णालय यांच्या संयुक्त विघमाने मौजे पाटोदा बु येथील भव्य मोतीबिंदू शिबीर संपन्न* दि.28/10/2020 ऑक्टोबर रोजी जळकोट तालुक्यातील मौजे पाटोदा ग्रामपंचायत कार्यालय येथील टाळता येणारे अंधत्व कमी करण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्ष व उदयगिरी नेत्र रूग्णालय विशेष मोहीम घेत ग्रामीण भागातील मोतीबिंदू बँकलाँग व मोतीबिंदूचा लोड कमी करण्यासाठी गावातील सर्व वृद्ध स्त्री व पुरुष नेत्र तपासणी आे पी डी ९० व शस्त्रक्रियेसाठी २४जन शिबीर कार्यक्रम संपन्न झाले कार्यक्रमाचे उद्घाटन मा.पोलीस निरीक्षक जळकोट .श्री.जी. एम.सोंदारे साहेब यांच्या हस्ते सरस्वतीच्या प्रतिमेचे पुजन झाले , तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मा. श्री.चंद्रहार ढोकणे साहेब बी. डी.ओ. जळकोट तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.आर.एन.लखोटिया साहेब , श्री. माधव होनराव तालुकाध्यक्ष प्रहार अपंग क्रांती आंदोलन , श्री. राजाभाऊ चौगुले जिल्हाध्यक्ष प्रहार जनशक्ती पक्ष लातूर होते व डाॅ पटेल व बी डी आे ढाकणे साहेब यांनी अनमोल असे मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे आयोजन श्री. नागनाथ हरिभाऊ गुट्टे ता.संपर्क प्रमु...

रावण दहन करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची आदीवासी समाजाची मागणी

इमेज
*राजा रावन दहन बंद करा*  प्रतिनिधी कळमनुरी  दि.22 ऑक्टोंबर  विजयादशमीच्या दिवशी हिंगोली व जिल्ह्यात होणारे राजा रावण दहन तात्काळ बंद करा .  राजा रावण आदिवासी सामाजाचे आदर्श  आहे व आदिवासी सामाज राज रावण यांना आपले दैवत मानतात त्यामुळे आदिवासी सामाजाच्या भावना दुखावल्या जातात. हिगोंली जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी राजा रावण पुतळ्याचे  दहन करण्यात  आले तर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. उपस्थित भारतीय आदिवासी पॅंथर संघटना चे अध्यक्ष प्रशांत बोडखे ,रावण साम्राज्य ग्रुपचे अध्यक्ष सुखदेव कोकाटे,रावण साम्राज्य ग्रुपचे उपअध्यक्ष राम ढाकरे, नवनाथ बेले,सचिन चिभडे, अंकुश बंदुके,दाटे दिपक उपस्थित आदिवासी समाज बांधव.  *बातमी शेअर करा आणि आपल्या बातमीला प्रसिध्द करण्यासाठी संपर्क साधावा  कळमनुरी प्रतिनिधी गुणाजी चाकोते सर 

प्रहार किनगाव चा महावितरण ला दणका सहा दिवसात बसवली डि.पी . (रोहीत्र )

इमेज
किनगाव अहमदपुर महावितरण कार्यालय वर #प्रहार चा दणका#......... निवेदन दिल्यापासून सहाव्या दिवशी डिपी उपलब्ध...प्रहार जनशक्ती पक्ष किनगाव च्या वतीने महावितरण कार्यालय अहमदपुर येथे मारवाडी डिपी किनगाव गेली पाच महिने झाले रिपोर्ट देऊनही डिपी उपलब्ध होत नव्हता,आज पाच महिने झाले बंद पडली होती. शेतक-यांचे बे हाल झाले होते, तरी रब्बी हंगामाची सुरुवात झाली आहे शेतकरयावर आर्थिक संकट निर्माण झाले होते,डिपी बंद असल्याचा रिपोर्ट जुन,जुलै महिन्यात देण्यात आला होता.तरी लाईट नसल्यामुळे विविध संकटाला सामोरे जावे लागत होते पशुधनावर पाण्यावाचुन उपासमारीची वेळ आली होती लवकरात लवकर डिपी नाही बसली तर महावितरण कार्यालय अहमदपुर मुख्य अभियंता उपविभागीय अधिकारी काळे साहेब यांना आठ दिवसांत डिपी नाही बसला तर, कोरोना महामरीचे भान ठेवून लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता सहाव्या दिवशी डिपी उपलब्ध करून देण्यात आला आहे हिच प्रहार ची ताकत जय हिंद जय प्रहार.. प्रहार जनशक्ती पक्ष किनगाव व शेतकऱ्यांच्या वतीने महावितरण चे उपविभागीय अधिकारी काळे साहेब, किनगाव महावितरण चे जाधव साहेब त्यां...

बौद्ध धम्म सदाचार आणि लोक कल्याणाचा जिवनमार्ग - प्रा. बालाजी आचार्य

इमेज
*बौद्ध धम्म सदाचार आणि लोककल्याणाचा जीवन मार्ग*           प्रा बालाजी आचार्य  अहमदपूर (प्रतिनिधी ) बोधीसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी बौद्ध धम्माचा स्वीकार करून जागतिक , ऐताहासीक धम्मक्रांतीकरून विविध धर्मात सामाजिक परिवर्तन घडवून आणले डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलेला बौद्ध धम्म सदाचार, बंधुभाव, समता, स्वातंत्र्य ,न्यायाचा मार्ग असून लोककल्याणाचा जीवन मार्ग आहे असे प्रतिपादन प्रा. बालाजी आचार्य यांनी रविवार दि 25 ऑक्टोबर रोजी अहमदपूर येथे धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त पंचशील ध्वजारोहण प्रसंगी नियोजीत कार्यक्रमात केले    अहमदपूर शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर ६४ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन अतिशय उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रिपाईचे राज्य सचिव बाबासाहेब कांबळे होते तर ध्वजारोहक प्रा बालाजी आचार्य प्रमुख उपस्थिती प्रा डॉ सिद्धार्थकुमार सुर्यवंशी ,संयोजक रिपाईचे तालुकाध्यक्ष अरुणभाऊ वाघबंर ,अशोक सोनकांबळे ,अॅड सुभाष सोनकांबळे,धर्मपाल गायकवाड, बालाजी वाघमारे, पी...

भारतीय बौद्ध महासभा लातुर च्या वतीने अशोक विजयादशमी व धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा

इमेज
*भारतीय बौद्ध महासभा लातूर च्या वतीने अशोक विजयी दशमी व धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा*  लातूर :- भारतीय बौद्ध महासभा जिल्हा, तालुका व शहर शाखेच्या वतीने अशोक विजयादशमी दिनानिमित्त व 64 व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क येथे अभिवादन करण्यात आले यावेळी धम्म संस्थेच्यावतीने बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना पू. भंते यश कश्यपायन, जिल्हाध्यक्ष प्रा बापूसाहेब गायकवाड, जिल्हा सरचिटणीस अर्जुन कांबळे, शहराध्यक्ष कुंदन गायकवाड, केंद्रीय शिक्षिका आशाताई चिकटे, जिल्हा सचिव महिला विभाग मंगलताई सुरवसे, शहर सचिव महिला विभाग रेखाताई सुरवसे, तालुका सरचिटणीस प्रा. जीवन गायकवाड, अशोक शिंदे गुरुजी यांच्यावतीने पुष्पचक्र अर्पण केले.  यावेळी त्रिशरण, पंचशील, भीम स्मरण, भीम स्तुती विधी बौद्धाचार्य दत्तात्रय भोसले, नानासाहेब आवाड, बौद्धाचार्य देवदत्त बनसोडे यांनी घेतले तसेच 14 ऑक्टोबर 1956 रोजी नागपूर मुक्कामी बोधिसत्व डॉ. बाबासाहेबांनी दिलेल्या 22 प्रतिज्ञा वाचन लातूर तालुका संस्कार विभाग प्रमुख प्रेमनाथ कांबळे यांनी उपस्थितांना दिल्या धम्मचक्र प्रवर्तन दिन...

संपूर्ण ओबीसी समाजाचा राज्यव्यापी आंदोलनाचा एल्गार

*संपूर्ण ओबीसी समाजाचा राज्यव्यापी आंदोलनाचा यल्गार* - राष्ट्रीय ओबीसी महासंघाची सहविचार सभा संपन्न - सहविचार सभेत निर्णय (प्रतीनीधी) :              अखिल भारतीय ओबिसी महासंघ पुरस्कृत राष्ट्रीय ओबीसी महासंघ बऱ्याच दिवसानंतर आपली एक आंदोलनात्मक तयारी करण्यासाठी आज दि . २४.१०.२०२० रोजी नॅशनल इन्स्टिटयूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट, पावनभूमी, नागपूर येथे डॉ. बबनराव तायवाडे यांच्या अध्यक्षतेखाली सभा संपन्न झाली.                 या सभेत राज्य व केंद्रसरकारचे लक्ष वेधण्याकरिता दि.०३ नोव्हेंबर २०२० रोजी महाराष्ट्रातील सर्व जिल्हाधिकारी व तहसिलदारांमार्फत राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे उपरोक्त मान्यवरांना निवेदन पाठविण्यात येईल. दि. १० नोव्हेंबर २०२० ला मुंबई येथे ओबिसी संघटना, पदाधिकारी यांच्या उपस्थितीत ओबीसी गोलमेज परिषदेचे आयोजन करण्यात आलेले आहे व दि. ७ डिसेंबर २०२० ला हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी ओबीसी महामोर्चाचे आयोजन करून विधान भवनाला घेराव करण्याचा निर्णय राष्ट्रीय ओबीसी महासंघ व संलग्नित जातीय व ओबीसी संघटनांनी...

शिवक्रांती संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष भुजंगराव उगीले यांच्या उपस्थीतीत उदगीर कार्यकारीणी जाहीर

इमेज
शिवक्रांती संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष मा.श्री भुजंगजी उगिले याच्या नेतृत्वाखाली आज उदगीर तालूका कार्यक्रणी जाहीर करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.श्री. भोसले सर हे होते  तर प्रमुख पाहुणे म्हणून शिवक्रांती संघटनेचे  मराठवाडा अध्यक्ष  मा. श्री .भुजंगजी उगिले.  लातूर जिल्हा उपाध्यक्ष. मा.श्री.भानुदास चव्हाण सर बालाजी पाटील. सुनिल पेड हे उपस्थित होते .मान्यवारांच्या उपस्थित मा.श्री. अनिल भोसले यांची उदगीर तालुका अध्यक्ष पदी निवड करण्यात आली  तथा तालुका उपाध्यक्ष पदी  मा.श्री बापूराव नादुरगे यांची निवड करण्यात आली तसेच तालुका संपर्क प्रमूख पदी मा.श्री राम पेदवाड याना नियुक्त करण्यात आले तथा. ता.संघटक पदी मा.प्रमोद सुवर्णकार याना नियुक्त करण्यात आले तथा ता प्रसिद्धी प्रमूख पदी मा. श्री. अमर पवार याना नियुक्त करण्यात आले. तसेच ता. सचिव पदी मा. श्री .सिध्देशवर जळकोटे याना पदभार देण्यात आला.  मराठवाडा अध्यक्ष मा.श्री उगिले यानी बोलताना शिवक्रांती संघटनेचे अध्यक्ष मा. श्री.दत्तात्रय काळे साहेबांचे विचार काय आहेत आणि आपल्य...

प्रगतीचा निधी वळवला जात असल्याने हिवाळी अधिवेशनात बजेटचा कायदा कारावा.सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे एन.डी.एम.जे संघटनेची मागणी

इमेज
*प्रगतीचा निधी वळवला जात असल्याने हिवाळी अधिवेशनात बजेटचा कायदा कारावा* *सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे एन.डी.एम.जे संघटनेची मागणी* अहमदपूर (संजय कांबळे माकेगावकर)दि.मागील काही दिवसात सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचा अखर्चित निधी इतरत्र वळवला जात असल्याने महाविकास आघाडीच्या सरकार विरोधात मागासवर्गीय जनतेमध्ये प्रचंड चीड व आक्रोश असल्याचे जाणवत असतानाच राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे हे सोलापूर दौऱ्यावर येताच त्यांना पुरोगामी संघटनांच्या रोषास व रोगास सामोरे जावे लागले.सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचा बौद्ध, दलित आदिवासिंच्या प्रगतीचा निधी सार्वजनिक आरोग्य विभाग व ग्रामीण विकास विभाग या विभागाकडे वळवला असल्याचे लोकप्रिय नेते वैभव गिते यांनी धनंजय मुंडे यांना पुराव्यानिशी दाखवुन दिले. आंबेडकरी चळवळीचे जेष्ठ नेते,माळशिरस शहराचे माजी सरपंच विकास (दादा) धाइंजे यांचे नेतृत्वाखाली नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टीस या संघटनेचे राज्य सचिव लोकप्रिय नेते वैभव गिते, राज्य प्रसिद्धी प्रमुख प्रमोद शिंदे,संभाजी साळे यांच्या शिष्टमंडळाने धनंजय मुंडे...

महाराष्ट्राने गमावले दोन हॉकीपटू वडमारे परिवार आणि क्रीडा क्षेत्रावर पसरली शोककळा

इमेज
महाराष्ट्राने गमावले दोन हॉकीपटू त्रिशरण वाघमारे  रोहन रामभाऊ वाघमारे वय 18 रोहित रामभाऊ वडमारे वय सोहळा राहणार रामनगर औरंगाबाद हे दोघे भाऊ तीन दिवसापूर्वी आजी व मामांना भेटण्यासाठी टाकळगाव तालुका अहमदपूर जिल्हा लातूर येथे आले होते येथे आले असता फिरण्यासाठी म्हणून शेतात गेल्यावर मामाची मैस घेऊन तलावाकाठी फिरत असताना होण्याची इच्छा झाल्याने दोघेही तलाव तलावात उतरले परंतु दोघांनाही पोहता येत नसल्याने दोघांचाही तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना सोमवारी घडली आहे     याबाबत सविस्तर वृत्त असे की रोहन वडमारे आणि रोहित वडमारे राहणार रामनगर औरंगाबाद हे दोघे सख्खे भाउ महाराष्ट्राचे प्रसिद्ध हॉकीपटू आहेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत असताना या दोघांनीराष्ट्रीय व राज्यस्तरीय सामन्यातून महाराष्ट्राला यश प्राप्त करून दिले आहे मामाच्या गावी फिरण्यासाठी आल्यानंतर मामाचे शेतात शेत बघण्यासाठी गेले असता शेताच्या बाजूस असलेल्या तलावात पोहण्याची इच्छा झाल्याने हे दोघे भाऊ तलावात उतरले परंतु पोहता येत नसल्याने दोघांचाही सोमवारी पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आ...

प्रा. आरोग्य केंद्र किनगावला कर्मयोगी मधुकर दादा मुंढे यांचे नाव देण्यात यावे : बाळू आमले शहराध्यक्ष प्रहार जनशक्ती पक्ष किनगाव

इमेज
किनगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास कर्मयोगी कै मधुकर (दादा) गंगारामजी मुंढे साहेब  असे नाव देण्यात यावे किनगाव  अहमदपूर तालुक्यातील किनगाव प्रहार जनशक्ती पक्ष च्या वतीने मा ना श्री उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री म रा यांना निवेदन देण्यात आले आहे की,किनगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास कर्मयोगी कै मधुकर (दादा) गंगारामजी मुंढे साहेब  असे नाव देण्यात यावे असे तहसीलदार साहेब तहसील कार्यालय अहमदपुर यांच्या मार्फत मुख्यमंत्री साहेबांना निवेदन देण्यात आले आहे .कै मधुकर दादा यांनी किनगाव सरपंच पदावर असताना आनेक गोरगरिबांचे शेतकऱ्यांचे अपंगांचे कैवारी होते .त्यांनी आपल्या स्वताच्या मालकीची जमीन किनगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्र,बस स्टँड, पशुवैद्यकीय दवाखाना,जि प शाळा, आपल्या जमीनी शासनाला दान केल्या त्याचे कारयाने त्यांनी किनगाव चे नाव महाराष्ट्र भर गाजविले. आजही त्यांचे नाव  किनगाव येथील जनतेच्या तोंडात आहे  त्यांनी शिवसेनेत राहुन सरपंच पदापासून ते जिल्हा अध्यक्ष  पर्यंत जाऊन सामाजिक कार्य केले.सरपंच पदावर असताना त्यांनी गावांमध्ये रस्ते ,शाळा, द...

शेतकरी व कामगार विरोधी विधेयकाविरोधात स्वाक्षरी मोहीम

इमेज
शेतकरी व कामगार विधेयका विरुध्द स्वाक्षरी मोहीम. विष्णु हरण प्रातिनिधि आखाडा बाळापूर दि.20 ऑक्टोंबर  आज आखाडा बाळापूर मध्ये केंद्र सरकारने मंजूर केलेल्या मजूर व शेतकरी विरोधी विधेयक मागे घ्यावे यासाठी स्वाक्षरी मोहीम जिल्हा काँग्रेस कमिटी व तालुका काँग्रेस कमिटी यांच्या वतीने  राबविण्यात आली.   हे विधेयक म्हणजे शेतकरी आणि मजूर यांना देशोधडीला लावण्याचा भाजप सरकारचा डाव असल्याचे मत हिंगोली जिल्हा काँग्रेस कमिटी चे अध्यक्ष संजय पाटील बोंढारे यांनी व्यक्त केले. यावेळी उपस्थित काँग्रेस नेते जक्की कुरेशी तालुका काँग्रेस कमिटी चे अध्यक्ष धनंजय पाटील सूर्यवंशी, मा.सरपंच अभय पाटील सावंत , जी. प. सदस्य भगवान खंदारे, सभापती दत्ता पाटील बोंढारे, शाहबाझ कुरेशी ,पांडुरंग बोंढारे,राहुल पतोडे , शेतकरी , व कामगार उपस्थित होते.

विना पंचनामा एकरी पंचविस हजार मदत देण्यात यावी

इमेज
*एकरी २५ हजार विना पचंनामा, विना पहाणी सरसकट अतिवृष्टी मदत जाहिर करा* - काॅ.अर्जुन आडे अरविंद राठोड  तालुका प्रतिनिधी,  किनवट :किसान सभा, शेतकरी व शेतकऱ्यांच्या पोरांची बैठक इस्लापुर येथे नुकतीच संपन्न झाली. गेल्या दिवासांपासुन परीतिच्या पाउसाने प्रचंड नुकसान केले आहे.शेती पिके उदध्वस्त झाले आहेत.हाता तोंडाला आलेले सोयाबीन कापूस ,मका इत्यादी पिके जाग्यावर कुजून कोंबे फुटली आहेत. परिणामी शेतकरी आणि शेतीवर अवलबूंन असलेले शेतमजूर असामाणी सुलातांनी सकंटातुन जात आहेत. राज्य सरकार तात्काळ मदत जाहीर करायचे सोडून, पहाणी दोरे ,पंचनामा इत्यादी गोष्टी करत आहेत. तात्काळ पंचनामा न करात, पहाणी चे सोंग न घेता, शेतकऱ्यांना एकरी २५ हजार अतिवृष्टी मदत जाहिर करा असे मत बैठकीत काॅ.अर्जुन आडे यांनी केले. या बैठकीत एकरी २५ हजार ओला दुष्काळ मदत जाहिर करा, पिक विमा कंपण्या कडून पिक विमा वाटप करा, खरीप हंगामात अद्याप हि निकाली न निघालेल्या सर्व शेतकऱ्यांचे पिक कर्ज निकाली काढा, शेतीवर अवलबूंन असलेल्या मजुरांना रोजागरा हामी योजेने अंतर्गत रोजगार द्या या मागण्या घेऊन, २८ अक्टोंबर ला निर्णाय...

किनगावात रस्त्याची दुरावस्था , नेमकं जबाबदार कोन ?

इमेज
किनगावात मुख्य रस्त्याची दुरावस्था , नेमकं जबाबदार कोन ? त्रिशरण वाघमारे अहमदपुर प्रतिनिधी किनगावच्या मुख्य रस्त्यावरच खड्डे पाण्याने सतत भरलेले असल्याने पायी चालणाऱ्या नागरीकांची तारांबळ उडताना दिसते. तसेच वाहणे सुद्धा रस्त्याच्या कडेला लावुन वाहनचालक बिनधास्त गप्पा मारत बसलेले दिसतात . याचा त्रास मात्र सामान्य नागरीकांना सोसावा लागत आहे       याबाबत सविस्तर वृत्त असे की अहमदपुर तालुक्यातील किनगाव मोठी बाजारपेठ म्हणुन ओळखले जाते . तीन जिल्हयातील व्यापारी आणि पंचक्रोशीतील नागरीक येथे खरेदीसाठी येत असतात . भविष्यात किनगावला तालुक्याचा दर्जा मिळावा म्हणुन इथल्या नेते मंडळींनी तसा प्रस्तावही प्रशासनाकडे पाठवलाय , परंतु 548 महामार्गाच्या विकासकामाला सुरु झाल्यापासुन किनगावचा चेहरा मोहरा बदललेला दिसतोय . सावरकर चौक येथे रस्त्याचे अर्धवट काम त्यामुळे उडणारी धुळ आणि आजुबाजुला राहणाऱ्या नागरीकांनी घरातील सोडलेले सांडपाणी नाल्या नसल्याने मुख्य रस्त्यावर आल्याने रस्त्यात साचलेली डबकी त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या वाहणामुळे अंगावर चिखल उडतो की काय म्हणुन अंग चोरुन चालणारा न...

वंचित आघाडीचा 181 व्या दिवसा चा उपक्रम

इमेज
* वंचित बहुजन आघाडी चा सलग 181 दिवस उपक्रम* मा पांडुरंग (काका) हुंडेकरी (माजी मंडळ अधिकारी)च्या हस्ते 13 गरजूंना धान्य किट चे वाटप करण्यात आले  उस्मानाबाद दि 8 ऑक्टोबर (प्रतिनिधी) वंचित बहुजन आघाडी मा पांडुरंग (काका) हुंडेकरी (माजी मंडळ अधिकारी) हस्ते .13 गरजू कुटुंबांना किराणा मालचे वाटप दि 8 ऑक्टोबर रोजी करण्यात आले. वंचित बहुजन आघाडी च्यावतीने गरजू कुटूंबांना जीवनावश्यक साहित्याचे वाटप करण्यात येत असून आजचा181 वा दिवस आहे. तर आजपर्यंत 3142 कुटूंबांना अन्नधान्य वाटप केले आहे.  वंचित बहुजन आघाडी , भारतीय बौद्ध महासभा, प्रबुद्ध कुष्ठरोग निर्मूलन व पुनर्वसन संस्था, कामठा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सेवाभावी संस्था, उदगीर ,शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व हितचिंतक दानशूर यांच्या सहकार्याने व मिलिंद रोकडे जीवन कदम सुरेश चौधरी विकास बनसोडे मार्गदर्शनाखाली हे वितरणप करण्यात येत आहे.या वाटपाच्या वेळी वंचित बहुजन आघाडीचे सुरेश चौधरी,बाळासाहेब राऊत धनाजी भालेकर , कमलेश कदम उपस्थित होते. सूत्रसंचालन शुकेशन ढेपे यांनी तर उपस्थितांचे आभार कृष्णा लोंढे यांनी मानले.

एम आय एम पदाधिकाऱ्यांचा वंचित बहुजन आघाडीत जाहीर प्रवेश

इमेज
आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन  वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा महासचिव ,युथ आयकॉन, खंबीर नेतृत्व संतोषभाऊ  सूर्यवंशी आणि रमेश गायकवाड यांच्या उपस्थीतीत एम आय एम चे उदगीर तालुका अध्यक्ष मोहमद शफी बाशुमिया कुरेशी, शहरअध्यक्ष मझहर अमजत पटेल ,शेख हमीद मेहताबसाब , एडवोकेट युसूफ अब्दुसाब शेख यांचा वंचित बहुजन आघाडी मध्ये जाहीर प्रवेश. यावेळी जिल्हाध्यक्ष सदाशिव भिंगे, ऍड सरफराज पठाण ,जिल्हा उपाध्यक्ष वैभव कांबळे, जिल्हा उपाध्यक्ष मार्शल माने, जिल्हा उपाध्यक्ष प्रा.अतुल धावारे, दिलीपजी कांबळे, सल्लागार adv रोहित सोमवंशी,adv विठ्ठल खोडके, रमेश माने,  कुलदीप कांबळे. बुद्ध भूषण गायकवाड उपस्थित होते. सर्वांचे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.💐💐